बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

महीपतगड-सुमारगड-रसाळगड

दुर्गम सह्याद्रीत वसलेले गिरी दुर्ग त्रिकुट एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे पुढील प्रमाणे सलग डोंगरयात्रा करून पहाता येतील.महीपतगड-सुमारगड-रसाळगड किवा रसाळगड- सुमारगड-महीपतगड.हे तिन्ही गड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले आहेत.या परिसरात घनदाट जंगल व हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे वाटाड्या सोबत घ्यावा.तसेच पाण्याचा पुरेसा साठा सोबत घेणे आवश्यक आहे.

महीपतगड (उंची ३१०० फुट)

गडाचा विस्तार प्रचंड आहे व घनदाट जंगल असल्यामुळे पूर्ण गड पाहण्यास चार तास लागतात.गडफेरी मध्ये अनेक भग्न अवशेष पाहायला मिळतात.गडावर जाण्यासाठी वाडी बेलदार गावातून ३० मिनिटे लागतात व दहिवली गावातुन ४ तास लागतात. रसाळगडवरून सुमारगड मार्गे ८ तास लागतात.

सुमारगड (उंची ३००० फुट)

गडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गड फेरीसाठी एक तास लागतो.गडावर जाण्यासाठी  महीपतगड ते सुमारगड ३ तास लागतात. रसाळगड ते सुमारगड ४.३० तास लागतात.गडावर जाण्यासाठी लावलेली शिडी पडलेली आहे त्यामुळे सोबत दोरी असल्यास झाडाला दोरी बांधून चढता येते .पुरेसा अनुभव असल्यास किंचित अवघड श्रेणीचे कातळारोहण करून गडावर प्रवेश करता येईल.

रसाळगड (उंची १८०० फुट)

गडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस दोन तास लागतात.वाडी पेठ मधून २० मिनिटात आपण गडावर पोहोचतो. महिपतगडवरून सुमारगड मार्गे रसाळगड ला पोहचण्यासाठी ८ तास लागतात.